श्रध्दांजली

ते हिशोब कधीच नाही लागले ....
  देवाला दक्षिणेत टाकलेले पैसे आणि त्याने दिलेले आशिर्वाद ,
 कोणाला बोललेले तिखट शब्द आणि त्यांच गोड हसू ,
  एक संवादाची हाक आणि दुसरीकडे शब्दांवाचूनची शांतता,
  मदतीसाठी एक आवाहन आणि हजारो मनांचं धावणं ,
 समजुतीचा उदेश आणि त्याला गैरसमजुतीचं खलबत ,
 लॉटरीचं तिकिट रुपयाच आणि बक्षीस लाखांचं,
  हवेहवेशे सगळ्यांबरोबरचे एकत्र क्षण आणि एकटेपणातला स्वतःला उलगडवणारा प्रवास,
  आनंदाचे मिळालेले सेकंद आणि वेदनेचे भोगलेले तास ,
  आणि ... आणि ,
 शंभर वर्ष जगलेलं जीवन आणि काही सेकंदांमधला मृत्यू ....
  ज्येष्ठ महान साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना समर्पित 
  •  

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट